<p>राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विविध नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.</p><p>खासदार सुप्रिया सुळे यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांचे आभार मानले. शरद पवार यांच्या उमेदवारीसाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.</p><p>दरम्यान, शिवसेनाने राज्यसभेसाठी ज्योती वाघमारे यांना उमेदवारी दिल्याबाबत मंत्री संजय शिरसाट यांनी हा महिलांसाठी मोठा निर्णय असल्याचं सांगितलं. महाराष्ट्रातील महिलांकडून या निर्णयाचं स्वागत होईल, असंही त्यांनी म्हटलं.</p><p>तर शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनीही या निर्णयाचं स्वागत करत, “सामान्य महिला आता राज्यसभेत जनतेचे प्रश्न मांडतील,” असा विश्वास व्यक्त केला. तसेच संसदेत अनुभवी आणि युवा नेत्यांचा समतोल लोकशाहीसाठी चांगला असल्याचंही त्यांनी सांगितलं.</p><p>राज्यसभा निवडणूक आणि महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर अधिक अपडेट्ससाठी Asianet News Marathi ला Subscribe करा.</p><p>#RajyaSabhaElection #SupriyaSule #SanjayShirsat #MilindDeora #Maharashtra #AsianetNewsMarathi #Politics </p>
